राज्यातील 14 जिल्ह्यांचे राशन बंद करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा अशा 14 जिल्ह्यांतील दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांचे राशन बंद करण्यात येणार आहे. आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान्याऐवजी पैसे दिले जाणार आहे.