New Districts in Maharashtra: महाराष्ट्रात 22 नवीन जिल्हे होणार, नवीन जिल्ह्यांची यादी पहा..!

New Districts in Maharashtra: महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास पाहता गुजरात आणि महाराष्ट्र हे एके काळी एक राज्य होते, भाषेच्या आधारे प्रांत निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र हा मराठी भाषेचा प्रदेश आणि गुजरात गुजराती भाषेचा प्रदेश हे वेगळे राज्य बनले. गुजरातने मुंबई मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण मुंबई मिळाली नाही आणि 01 मे 1960 रोजी महाराष्ट्र अस्तित्वात आला, महाराष्ट्र अस्तित्वात आला तेव्हा लोकसंख्येच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने अनेक जिल्हे मोठे असल्याने प्रशासकीय कामासाठी नागरिकांना ये-जा करताना अडचणींना सामोरे जावे लागत होते.

त्यानंतर सुमारे 20 वर्षांच्या कालावधीत, म्हणजे सुमारे दोन दशकांत आणखी दहा जिल्हे निर्माण झाले. मात्र आजही आणखी काही जिल्हे करण्याची मागणी जोर धरत आहे. खरे तर महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यातील दुर्गम खेड्यातील रहिवाशांना जिल्हा मुख्यालयी जाण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. जिल्ह्यातील कामे करण्यासाठी नागरिकांना एक ते दोन दिवस काढावे लागत आहेत. अशा स्थितीत खेड्यापाड्यातील नागरिकांनाही जिल्ह्याचा संपर्क सुलभ व्हावा. या पार्श्वभूमीवर राज्यात एकूण २२ नवीन जिल्ह्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या 22 जिल्ह्यांची मागणी सरकारकडे प्रस्तावित आहे.

दरम्यान, आज आपण विद्यमान 36 जिल्हे आणि नवीन प्रस्तावित 22 जिल्ह्यांबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

पहिले २६ जिल्हे कोणते?
भाषिक प्रादेशिकीकरणानंतर महाराष्ट्रात २६ जिल्ह्यांची निर्मिती झाली. यामध्ये ठाणे, कुलाबा (रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर यांचा समावेश आहे. वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा (आता चंद्रपूर) जिल्ह्यांचा समावेश होता.

त्यानंतर गरज आणि मागणीनुसार शासनाच्या माध्यमातून नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्रात दोन दशके किंवा वीस वर्षांच्या कालावधीत 10 नवीन जिल्हे निर्माण झाले आहेत.

दहा नवनिर्मित जिल्हे

  • १ मे १९८१ रोजी रत्नागिरीचे विभाजन करून सिंधुदुर्ग हा नवा जिल्हा बनला.
  • १ मे १९८१ रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)चे विभाजन करून जालना हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला.
  • १६ ऑगस्ट १९८२ रोजी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याचे विभाजन करून नवीन लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • १ ऑक्टो. १९९० रोजी बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशीम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • १ जुलै १९९८ धुळे जिल्ह्याचे विभाजन करून आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली.
  • १ मे १९९९ परभणी जिल्ह्याचे विभाजन करून नवीन हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • १ मे १९९९ रोजी विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून नवीन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • १ ऑगस्ट २०१४ ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

22 प्रस्तावित जिल्हे (२०१८ मध्ये स्थापन समितीचा प्रस्तावानुसार)

  • नाशिकमधून मालेगाव, कळवण
  • पालघरमधून जव्हार
  • अहमदनगरमधून शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर
  • ठाणेमधून मीरा-भाईंदर, कल्याण
  • पुणे मधून शिवनेरी
  • रायगड मधून महाड
  • सातारा मधून माणदेश
  • रत्नागिरी मधून मानगड
  • बीड मधून अंबाजोगाई
  • लातूर मधून उदगीर
  • नांदेड मधून किनवट
  • जळगाव मधून भुसावळ
  • बुलढाणा मधून खामगाव, अचलपूर
  • यवतमाळ मधून पुसद
  • भंडारा मधून साकोली
  • चंद्रपूर मधून चिमूर
  • गडचिरोली मधून अहिरी (22 जिल्हे आहेत.)

Similar Posts