अखेर औरंगाबाद-पैठण महामार्गावरील अतिक्रमण काढायला सुरुवात; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात..

मागील काही वर्षांपासून औरंगाबाद-पैठण महा-मार्गाच्या चौपदरीकरणाचा कामाला शुभारंभ झाला असून, या रस्त्यावरील अतिक्रमण काढायस आज रविवार पासुन पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सुरवात झाली आहे.

औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती. विशेष म्हणजे आतापर्यंत पाच-सहा वेळा या कामाचे उद्घाटन सुद्धा झाले आले. मात्र, कामाला सुरवात झाली नव्हती. आता या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे DPR शेवटच्या टप्प्यात असून, याच महिन्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता वाढली आहे.

औरंगाबाद-पैठण या ५० किलोमीटर अंतराच्या महामार्गावर मागील अनेक वर्षापासून अतिक्रमण झाले होते. आता अतिक्रमण काढण्यासाठी ७ दिवसांचा अल्टिमेट मिळाल्याने अतिक्रमण धारकांमध्ये खळबळ माजली होती. मात्र, यावेळेस सुध्दा कारवाई होईल की नाही याबाबत शंका होती. पण आजपासून प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!