राज ठाकरे यांचे औरंगाबाद मध्ये जंगी स्वागत; क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या स्मारका समोर झाले नतमस्तक..

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे औरंगाबाद मध्ये ५.१५ वाजेच्या सुमारास आगमन झाले असता ढोल ताश्यांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन केल्यानंतर राज ठाकरे यांचा ताफा पुढे रवाना झाला.

राज ठाकरे दुपारी पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले असता घोडेगाव येथे त्यांच्या ताफ्याला अपघात झाला. यात काही गाड्यांचे नुकसान झाले, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. त्यानंतर ठाकरे यांचा ताफा पुढे निघाला. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रवेश करताच त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. वाळूज मध्येही राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!