सलोखा योजना महाराष्ट्र 2023

शेत जमिनीवर ताबा केला असल्यास किंवा वहिवाटी बाबत शेतकऱ्यांमध्ये वाद होत असल्यास हे वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने सलोखा योजना राज्यात राबवली आहे. त्या योजनेविषयी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे?

सलोखा योजनेच्या काही अटी व शर्ती पाहूया

  • सलोखा योजनेचा जो काही कालावधी असेल तो अदलाबदल दस्त करण्यासाठी निश्चित असलेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याबाबतचे अधिसूचना ही पूर्णपणे शासन राजपत्रात जी काही प्रसिद्ध तारीख झाली आहे त्यापासून दोन वर्षापर्यंतचा.
  • सादर योजनेअंतर्गत पहिला शेतकऱ्याच्या जमिनीवर ताबा घातला असेल तर तर तो बारा वर्षापासून पुढे असावा.
  • एकाच गावांमधील जमिनी धारक नागरिकांचा परस्परांकडे मालकीबाबतचा विषय वस्तुस्थितीनुसार पंचनामा मंडळ अधिकारी या सोबतच तलाठी यांच्याकडून पंचनामेवर नोंदणी वहीमध्ये प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. अदलाबदल दस्ताची नोंद करत असताना शेतकऱ्यांनी सादर पंचनामा दस्ता मध्ये जोडावा.
  • सलोखा योजनेच्या माध्यमातून जो काही दस्त असेल त्यामधील अधिकार या सोबतच अभिलेखांमधील सर्वसमावेशक क्षेत्र शेरे, भोगवटादार सत्ता प्रकार इत्यादी इतर बाबी विचारात घेऊन दोन्ही शेतकऱ्यांनी सर्व संमतीने अदलाबदलाची नोंद करून घ्यावी.
  • दोन्ही पक्षाची जमीन ही पूर्वीपासूनच तुकडा घोषित झालेली असावी. त्याबाबत गट प्रत ही दस्तासोबत जोडून अदलाबदली सोबत दस्त नोंदवून त्याप्रमाणेच दस्तचे संपूर्ण वस्तुस्थिती नुसार फेरफार आवर नाव नोंदणी करून घ्यावी.
  • या योजनेविषयी अधिक माहिती मिळवायचे असेल तर कृपया पुढील लिंक वर क्लिक करून शासन निर्णय पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!