महाराष्ट्रात ‘या’ २७ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस, काय आहे हवामान विभागाचा अंदाज..

केरळमध्ये नैऋत्य-मोसमी वाऱ्यांचे आगमन झाल्यावर मान्सून कर्नाटक किनारपट्टीच्या काही भागात दाखल झाला आहे. सध्या मान्सून गोवा सीमेवर रेंगाळलेला असून वेळेपूर्वी मान्सून राज्यात दाखल होईल, हा हवामान खात्याचा अंदाज सपशेल चुकला आहे.

येणारे काही दिवस हे कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पूर्व-मोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट –

हवामान खात्याने आज पुण्यासह औरंगाबाद, सांगली, बुलढाणा, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, बीड, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

हे जिल्हे वगळता इतरत्र पाऊस –

उत्तर महाराष्ट्रामधील काही जिल्हे वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह, ठाणे, जळगाव, पालघर, नंदुरबार, धुळे, भंडारा आणि गडचिरोली जिल्हे वगळता राज्यात सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला असून, वरील जिल्हे वगळता राज्यात सर्व भागात पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे. पुढील ५ दिवस कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे.

दक्षिण कोकणात पूर्व मोसमी पाऊस मान्सूनकरीता पोषक –

मान्सूनच्या आगमनाकरीता दक्षिण कोकणामध्ये पूर्व मोसमी पावसाची आवश्यकता असते. राज्यामध्ये पूर्व मोसमी पावसामुळे मान्सूनच्या आगमनाकरीता पोषक हवामान तयार होते. ४ दिवस दक्षिण कोकणामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून स्थिती मान्सूनच्या आगमानासाठी फायदेशीर ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!