औरंगाबाद जिल्ह्यात आज 0 रुग्णांची भर तर 28 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 21 मार्च 2022 रोजी 09 जणांना (मनपा 08 ग्रामीण 01) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 65 हजार 981 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 741 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 732 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 28 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.