Mukhyamantri Kisan Yojana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 6 हजार नव्हे, आता 12 हजार रुपये मिळणार, जाणून घ्या सविस्तर…

Mukhyamantri Kisan Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. मोदी सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसारखी राज्यात योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री किसान योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढील आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये वर्ग केले जातात. प्रत्येकी 2 हजार, असे तीन हप्त्यांमध्ये हे पैसे वर्ग केले जातात. आतापर्यंत या योजनेचा 11 हप्ते शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना 12 वा हप्ता 12 सप्टेंबरला मिळणार आहे. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकार अशीच योजना राबविणार आहे.
Mukhyamantri Kisan Yojana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळणार..

पीएम किसान योजनेसारखी राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ सुरू केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिल्या जाणार आहे. पीएम किसान योजनेसारखी ही रक्कम ठराविक महिन्याला टप्प्या-टप्प्यानं शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे. हा निर्णय कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. ‘Mukhyamantri Kisan Yojana 2022’
प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिल्या जातात. त्याच प्रकारे ‘मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्या जाणार आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी हे अनुदान कसे दिल्या जाईल, तसेच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र राहतील याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळतात. आता राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिल्या जाणार आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डबल फायदा होणार आहे.
हे देखील वाचा-
घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??