बाहेर बसून घराकडे का पाहतोस? म्हणत टोळक्याने केलेल्या मारहाणीत औरंगाबादेत तरुणाचा मृत्यू..
औरंगाबाद जिल्ह्यामधील 74 जळगाव या गावामध्ये चार ते पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करुन तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आली आहे. संतोष एरंडे असे या मारहाणीमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
औरंगाबाद जिल्ह्यामधील 74 जळगाव या गावामध्ये चार ते पाच जणांच्या टोळक्याने संतोष एरंडे नावाच्या तरुणाला केलेल्या बेदम मारहाणीनंतर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे. जीवन गटकाळ आणि वैभव गटकाळ असं मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. या खून प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.