Ayushman Bharat Yojana : आजारपणात मिळेल 5 लाखांचे मोफत उपचार! फक्त या ठिकाणी नोंदणी करा; पहा फायद्याची योजना-
Ayushman Bharat Yojana: आज देशभरातील मोठी लोकसंख्या आपल्याला विविध प्रकारच्या आजारांनी त्रस्त झालेली दिसेल. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की आर्थिक दृष्ट्या मजबूत नसल्यामुळे देशभरातील अनेक लोक त्यांच्या आजारावर योग्य तो उपचार अजिबात करू शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकार एक महत्त्वाची योजना राबवत आहे. ती योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना; प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणून सुद्धा या योजनेस सर्वत्र ओळखले जाते.

या योजनेच्या माध्यमातून सरकार देशभरातील गरीब लोकांना पाच लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण प्रदान करत आहे. जर तुम्ही सुद्धा भारत सरकारच्या या योजनेसाठी अर्ज सादर केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये ही बातमी नक्कीच तुमच्या फायद्याची ठरेल (sarkari yojana). आज या बातमीच्या अंतर्गत तुम्ही या योजने संबंधित अधिक माहिती जाणून घेऊ शकाल आणि याप्रमाणे अवलंब केल्यास तुमच्या आजारपणाच्या वेळी आयुष्यमान भारत योजनेचा (Ayushman Bharat Yojana) अगदी बिनधास्तपणे दावा करू शकाल.
Ayushman Bharat Yojana
तुम्ही जर आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज सादर केला असेल आणि आजारपणाच्या वेळी जो काही विमा संरक्षण अंतर्गत उपचार असेल तो घ्यायचा असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही रुग्णालयामध्ये अगदी बिनधास्तपणे उपचार घेऊ शकता.
रुग्णालयामध्ये गेल्यानंतर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तुमची नोंदणी आहे की नाही हे त्या ठिकाणी सिद्ध करावे लागेल ज्या रुग्णालयांच्या शासकीय पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. या सर्व बाबींसाठी आयुष्यमान हेल्प डेस्क उपलब्ध करून दिली आहे (government scheme). हॉस्पिटल मधील आयुष्यमान हेल्प डेस्कवर तुम्ही जाऊन अगदी तपशील पण तुमची ओळख तुम्ही पडताळू शकता व पाच लाखांपर्यंत अगदी मोफत उपचार मिळवू शकतात.
आयुष्यमान भारत योजनेसाठी ऑनलाईन अर्ज..
तुम्हाला सुद्धा आयुष्यमान भारत योजनेसाठी (Ayushman Bharat Yojana) ऑनलाईन अर्ज करून पाच लाखांपर्यंतचा मोफत उपचार मिळवायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये सर्वात प्रथम तुमच्याजवळ कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन त्या ठिकाणी ऑनलाइन अर्ज सादर करावा. ऑनलाइन अर्ज सादर करत असताना जी काही आवश्यक कागदपत्रे असतात, ती सोबत ठेवावीत आणि ऑनलाइन अर्ज करावा.
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा