शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! संभाजीनगर औरंगाबादसह ‘या’ 10 जिल्ह्यांसाठी 1200 कोटी 86 लाखांचा निधी वितरित..

राज्यात सप्टेंबर–ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठं नुकसान झालेलं होतं. या नुकसानग्रस्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत वितरित करण्याचा 17 नोव्हेंबर 2022 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय घेऊन 10 जिल्ह्यातील तब्बल 12 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 1200 कोटी 86 लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्यासाठी मंजुरी दीली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या शासन निर्णयातून जिरायत क्षेत्रासाठी 6 हजार 800 रुपये प्रति हेक्टर ऐवजी आता 13 हजार 600 (3 हेक्टरच्या मर्यादेत) तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 रुपये ऐवजी आता 27 हजार रुपये (3 हेक्टरच्या मर्यादेत) तर बहुवार्षिक म्हणजे फळबागांसाठी 18 हजार 500 रुपये प्रति हेक्टर ऐवजी आता 36 हजार 000 रुपये प्रति हेक्टर (3 हेक्टरच्या मर्यादेत) नुकसान भरपाई आर्थिक मदत मिळणार आहे.

सदरील निधीच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त संभाजीनगर (औरंगाबाद) आणि विभागीय आयुक्त पुणे यांच्या माध्यमातून 19 ऑक्टोबर 2022 तसेच 4 नोव्हेंबर 2022 रोजी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने तब्बल 12,86,74,66,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

संभाजीनगर (औरंगाबाद)सह 10 जिल्ह्यांची नावे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

अतीवृष्ठीची जिल्हानिहाय यादी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!