राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देताना पोलीस म्हणाले; माणसं करा पंधरा हजार गोळा, पण अटी पाळाव्या लागतील सोळा.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देत असताना पोलिसांनी 16 अटी-शर्ती लावल्या आहेत. यातील मुख्य म्हणजे या सभेसाठी 4:30 ते रात्री 9:45 पर्यंतचा वेळ देण्यात आला असून वंश, जात, भाषा आणि वर्ण या विषयावर कुणीही टिपणी करू नये असे आदेशित करण्यात आले आहे. 15 हजार लोकांपेक्षा जास्त जणांना सभेत आमंत्रित करू नये असे देखील पोलिसांनी सांगितले आहे.

केंद्रीय विद्यालय औरंगाबाद येथे ‘विशेष शिक्षक ‘ पदांची भरती.. जाणून घ्या..

राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांच्या तब्बल घातल्या या 16 अटी

👉🏻 सदर जाहीर सभा दिनांक 01/01/2022 रोजी 4.30 ते 9.45 या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.
👉🏻 सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
👉🏻 सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलीसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहराबाहेर प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावे. सभेला आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन ) पार्किंगसाठी निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पार्किंग करण्याच्या सूचना द्याव्यात. सभेसाठी येताना अथवा परत जाताना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रैली काढू नये. त्याच प्रमाणे राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असून आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरुन परत जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढु नये.

🚳 इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉन्च करण्यास केंद्र सरकारकडून बंदी; आगीच्या घटना वाढल्यानं निर्णय..

👉🏻 कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नयेत किंवा प्रदर्शन करु नये. तसंच शस्त्र अधिनियमातील तरतुदींचा भंग करु नये.
👉🏻 अट क्र. 2,3,4 बाबत समेत सहभागी होणाऱ्या नागरीकांना कळविण्याची जबाबदारी संयोजकांची राहील.
👉🏻 सदर कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरून निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांची शहर / गावांना अनुसरुन संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग, येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहीती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक सिटीचौक यांचेकडे घावी.
👉🏻 सभा स्थानाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा 15 हजार इतकी असल्यामुळे त्याठिकाणी 15 हजारा पेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.

👉🏻 सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी निर्देशीत केलेल्या ठिकाणी मजबुत बॅरीकेटस उभारावे. सभेसाटी येणाऱ्या प्रत्येक नागरीकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी (Frisking) करण्याचा अधिकार पोलिसांना राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
👉🏻 सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा परंपरा या वरून कोणत्याही व्यक्ती अथवा समुदायाचा अपमान होणार नाही, अगर त्याविरूध्द चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही, याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.
👉🏻 सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपका बाबत मा. सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुषण (नियंत्रण व नियमन) नियम 2000 नुसार परिशिष्ट नियम ३(१) ४(१) अन्वये क्षेत्र औद्योगिक क्षेत्र – 75 डेसीबल, व्यापारी क्षेत्र – 65डेसीबल, निवासी क्षेत्र – 55डेसीबल, शांतता क्षेत्र – 50 डेसीबल प्रमाणे आवाजाची मर्यादा असावी, वरील अटींचा भंग केल्यास पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 च्या कलम 15 अन्वये 5 वर्ष इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची आणि रु. 100000/- ( एक लाख फक्त) इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

👉🏻 सदर कार्यक्रमा दरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, ॲम्बुलन्स, दवाखाना, मेडीकल, विजपुरवठा, पाणीपुरवठा, दळणवळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
👉🏻 सभेच्या दिवशी वाहतुक नियमनासाठी या कार्यालयाकडून काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1959 कलम 36 अन्वयेची अधिसुचना सर्व संयोजक, वक्ते व सभेला येणाऱ्या नागरीकांना बंधनकारक राहील.
👉🏻 सभेसाठी येणाऱ्या महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी.

👉🏻 सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बँरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थितीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही बिघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची) व्यवस्था अगोदरच करावी.
👉🏻 सदर कार्यक्रमादरम्यान मिठाई व अन्नदान वाटप होत असल्यास अन्न व मिठाईतुन कोणासही विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
👉🏻 हा कार्यक्रम सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आपणास घालून दिलेल्या उपरोक्त अटींचे व शर्तीचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमाचे सर्व संयोजक व वक्ते यांच्यावर प्रचलित विधी, उपविधी व नियमानुसार कारवाई केली जाईल व अशा कारवाई दरम्यान ही नोटीस मा. न्यायालयात पुरावा म्हणुन वापरली जाईल याची नोंद घ्यावी.

पोलिसांनी घातलेल्या अटींच काटेकोर पालन करून राज ठाकरेंची सभा होणार – मनसे नेते बाळा नांदगावकर

राज ठाकरे 30 एप्रिलला औरंगाबादसाठी रवाना होणार

राज ठाकरे 29 एप्रिलला मुंबईहून पुण्यात पोहोचतील आणि 30 एप्रिलला सकाळी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्त्यांसह पुण्याहून औरंगाबादला रवाना होतील. मनसे पुणे शहराचे ज्येष्ठ नेते बाबू वागस्कर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून औरंगाबादला येताना राज ठाकरे यांच्यासोबत दीडशेहून अधिक वाहने येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!