स्थळ : PVR टॉकीज समोर
व्हिडिओ : राहुल जैस्वाल (फ्रीलांस जर्नालिस्ट)
सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीमुळे औरंगाबाद सारख्या स्मार्ट सिटी मध्ये प्रदूषण वाढत आहे. शहराच्या दळण-वळणाचे प्रमुख साधन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एसटी असली तरी, काही बस मधून मोठ्या प्रमाणात जीवघेणा काळा धूर निघत आहे, शिवाय या बसची पीयूसीही केली जात नाही.
औरंगाबाद शहरात गजबजलेल्या ठिकाणी रहदारी अधिक प्रमाणात असल्यामुळे एसटी बस चालताना प्रचंड प्रमणात काळा धूर बाहेर पडून नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होतो. यामुळे आजारांना आयतेच निमंत्रण मिळत आहे. यावर तोडगा काढण्याची मागणीही प्रवासी करत आहेत.